
| जळगाव | जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे शनिवारी (९मे) रोजी संचारबंदीत हटकल्याने एका पोलिसावरच काही समाजकंटकानी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. पोलिस कर्मचारी यांच्यावर लॉक डाऊन मुळे अतिरिक्त ताण असताना त्यांच्यावर असे हल्ले होणे दुर्दैवी आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील असे हल्ले करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे सांगितले आहे. तरीही हल्ले होत असल्याचे चित्र आहे.
या प्रकरणी वरणगाव पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरणगाव शहरातील तपतकठोरा रस्त्यावर काही उनाड तरुणांचा घोळका बसलेला होता. संचारबंदी असल्याने या रस्त्यावर गस्तीला असणारे पोलीस कर्मचारी श्री मनोहर पाटील यांना तरुणांचा घोळका दिसल्याने त्यांनी जमाव पांगवण्यांच्या उद्देशाने तरुणांना ‘गर्दी का करता? आपापल्या घरी जा?येथे थांबू नका.’ असे सांगितल्याने काहींना या गोष्टीचा राग आला. त्यातून त्या तरुणांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या गाडीला लाथ मारून खाली पाडून त्यांच्याच काठीने त्यांना बेदम मारहाण केली. यात श्री पाटील यांना जबर दुखापत झाली असून डोक्याला देखील मार लागला आहे.
या प्रकरणी सैय्यद शकील उर्फ अरबाज सय्यद, सय्यद अलीम सय्यद सलीम, सय्यद मुस्तकीन सय्यद सलीम या तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून चौथा आरोपी अल्पवयीन असल्याने त्यास समज देऊन सोडण्यात आले आहे. नुकताच अश्याच प्रकारे भुसावळ येथेही पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. जिल्ह्यात अश्या प्रकारे पोलिसांवर हल्ले होत असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल ढासळत आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री
निषेध अश्या प्रवृत्तीचा..👎