
| मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरण हाताळण्यास महाराष्ट्र सरकार अपयशी ठरत असल्याचा दावा करीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली.
दिल्लीतील विक्रम गहलोत यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना तसेच न्यायमूर्ती व्ही रामासुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांचे कान टोचले.
‘तुम्हाला ही मागणी करायची असेल तर राष्ट्रपतींकडे करा, त्यासाठी ही जागा नव्हे, अश्या शब्दांत खंडपीठाने सुनावले. केवळ एका अभिनेत्याच्या मृत्यूनंतर अशा प्रकारची याचिका ऐकून घेतली पाहिजे का? असा सवाल सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केला. अशा घटना महाराष्ट्रात वाढत असल्याचा युक्तीवाद यावेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडून करण्यात आला.
यादरम्यान याचिकेत नमूद असलेल्या घटना केवळ मुंबईच्या असून महाराष्ट्र हे किती मोठे राज्य आहे हे तुम्हाला माहिती तरी आहे का? असा संतप्त सवाल खंडपीठाने केला. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करता येत नसेल तर किमान मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील कायदा-सुव्यवस्था काही दिवसांसाठी सैन्याकडे सोपवायला हवी. घटनेच्या कलम- ३५२ चा आधार घेत न्यायालयाने यात हस्तक्षेप करावा अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री