
| नवी मुंबई | राज्यभरातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यात नवी मुंबईही पुढे आहे. तेथे कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. येथील भागांमध्ये दररोज २०० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत आहेत. यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबईत आता पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. २९ जूनपासून येथे लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे.
नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्ण सातत्याने वाढत असल्यामुळे पालकमंत्र्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे. कारण येथे जवळपास ४४ कंटेन्मेंट झोन आहे. या भागांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. ७ दिवसांसाठी हा लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग थांबवता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान २६ जून रोजी नवी मुंबईमध्ये २२४ नवीन रुग्ण आढळले आहेत. ही संख्या खूप जास्त आहे. आता येथील कोरोना बाधितांचा आकडा हा ५ हजार ८५३ वर जाऊन पोहोचला आहे. तर आतापर्यंत येथील १९४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे चिंता ही वाढली आहे. धोका टाळता यावा यासाठी लॉकडाऊनचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री