लिंबू आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहे. खास करून गर्मीच्या दिवसांमध्ये तर फारच लाभदायक आहे. उन्हाळ्यात रसायन मिसळलेली कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा शहाळे, लिंबू पाणी, कोकम सरबत घेणं नेहमीच चांगलं. लिंबू पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जाऊन शरीर साफ होण्यास मदत होते. दिवसभरात लिंबू पाणी कधीही घेणं चांगलं. मात्र सकाळी उठून लिंबू पाणी घेणं शरीरासाठी अधिक चांगलं.
काय आहेत लिंबू पाणी पिण्याचे फायदे :
✓ लिंबू पाणी शरीरात पचक द्रव्यांना बनवण्यासाठी प्रोत्साहित करतो. हे पचन क्रिया उत्तम ठेवण्यासाठी देखील मदतगार आहे.
✓ लिंबू पाणी व्हिटॅमिन सी ने भरपूर असत. तसेच यात एंटी-ऑक्सीडेंटचे गुण देखील असतात. ज्याने त्वचेचे डाग दूर होण्यास मदत मिळते आणि त्वचेत निखर येतो.
✓ सकाळी उठून नेमाने लिंबू पाणीचे सेवन केल्याने दिवसभर फ्रेश वाटत आणि शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही.
✓ जर सांधेदुखीचा त्रास असेल तर देखील लिंबू पाणी पिणे योग्य असत.
✓ वजन कमी करायचे असेल तर सकाळी उठून लिंबू पाण्यापेक्षा दुसरे कुठलेही उपाय नाही आहे.
✓ लिंबू पाण्यामुळे तोंडातील दुर्गंधी दूर होण्यास मदत मिळते. तसेच याचा वापर केल्याने ताजगी कायम राहते.
✓ लिंबू पाण्यात व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात राहत. जे रोग प्रतिरोधक क्षमतेला बूस्ट करण्याचे काम करतो.
- सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा
- लोकसभा निवडणुकीत मतदानात होतेय हेराफेरी ? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचं सत्य
- कंपनी असावी तर अशी… IT कंपनीने बाजारपेठेत उडवली खळबळ, लाभांशाची करणार लयलूट
- मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका
- वसुली करणाऱ्यांना वसुली सोडून तसेही दुसरे काही सुचते असे नाहीच.