![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2020/05/PicsArt_05-13-03.11.17-e1589363291500.png?resize=880%2C528&ssl=1)
| जळगाव | गेल्या दहा बारा वर्षात जन्माला आलेले नेते आता राजकारणात चमकायला लागले आहेत आणि आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत असं म्हणत भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी आपल्याच पक्ष नेतृत्वावर टीका करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. महाराष्ट्राच्या जनतेत आणि मला मानणाऱ्यांमध्ये एक संताप आहे. या संतापाचं कधी एकत्रीकरण होऊन स्फोट होईल हे सांगता येत नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे की, “निव्वळ मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार ही गोष्ट जनतेला आवडली नाही का ? कोणत्या कारणासाठी ? याचा शोध मी घेत आहे. मेहनत आणि कष्टाने आम्ही महाराष्ट्रात भाजपाचं एकट्याच्या बळावर सरकार आणलं होतं. त्या कालखंडात आत्ता आहेत त्यातील अनेक लोक नव्हतेसुद्धा. हे अलीकडे १०-१२ वर्षात जन्माला आलेले राजकारणात चमकायला लागले आहेत आणि आम्हाला अक्कल शिकवत आहेत.”.
“मी गेल्या चाळीस वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ आहे. पण पक्षाने माझ्यावर अन्याय केल्याची भावना आहे. महाराष्ट्राच्या जनतेत आणि मला मानणाऱ्यांमध्ये एक संताप आहे. या संतापाचं कधी एकत्रीकरण होऊन स्फोट होईल हे सांगता येत नाही,” असंही खडसे यांनी म्हटलं आहे. कोरोनाचं सावट दूर झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
एकंदरीत, खडसे यांचे पक्षातून जाणीवपूर्वक खच्चीकरण केले असल्याची त्यांच्या चाहत्यांची भावना आहे. आपल्या कष्टाच्या जोरावर त्यांनी भाजपला तारले होते, परंतु आता त्यांची पक्षातील अवस्था थोडी वाईट आहे, याला जबाबदार माजी मुख्यमंत्री असल्याची जनमानसात भावना आहे.
- सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा
- लोकसभा निवडणुकीत मतदानात होतेय हेराफेरी ? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचं सत्य
- कंपनी असावी तर अशी… IT कंपनीने बाजारपेठेत उडवली खळबळ, लाभांशाची करणार लयलूट
- मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका
- वसुली करणाऱ्यांना वसुली सोडून तसेही दुसरे काही सुचते असे नाहीच.