
| इंदापूर/ महादेव बंडगर | कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी दि.१२ सप्टेंबर ते २० सप्टेंबर अखेर इंदापूर तालुक्यात जनता कर्फ्यू लागू करण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
तालुक्यात कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रसार पाहता कोरोनाची साखळी तोडणे खूप गरजेचे होते. व्यापारी पेठा बंद करून गर्दी नियंत्रित करण्यासाठी लॉक डाऊन बाबत काही कठोर निर्णय घेणे गरजेचे होते.आणि त्याच अनुषंगाने दिनांक १२ सप्टेंबर ते २० सप्टेंबर अखेर जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या संदर्भामध्ये सर्व व्यापारी संघटना व पदाधिकारी यांची बैठक इंदापूर येथे आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीमध्ये सर्वांच्या अडचणी ऐकून घेण्यात आल्या आणि त्यानुसार सर्वानुमते जनता कर्फ्यू लागू करण्याचे निश्चित करण्यात आले.
या कालावधीमध्ये तालुक्यातील जनतेने प्रशासनाने सांगितलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संपूर्ण तालुका वासियांना केली आहे .या लॉक डाऊन च्या यशस्वीतेनंतर खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्याची पुढील दिशा ठरणार आहे. त्यामुळे कोणताही हलगर्जीपणा न दाखवता. काटेकोरपणे लॉक डाऊन यशस्वी करून दाखवावा असे आवाहन भरणे यांनी नागरिकांना केले आहे.
- नकळत सारे घडते..!
- मैं अपनी फेव्हरेट हूँ..!
- “पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!
- २०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!
- पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर !’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..!