
| मुंबई | सर्वसामान्यांच्या लालपरी मध्ये आता पडदे बसवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्याची चाचपणी एसटीच्या दापोडी येथील कार्यशाळेत सुरू होणार असल्याची माहिती महामंडळाने दिली.
एसटी महामंडळाकडून जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बस चालवताना ४४ ऐवजी २२ प्रवाशांनाच प्रवासाची मुभा दिली आहे. त्यामुळे एसटीचे उत्पन्न कमी झाले आहे. ही परिस्थिती पुढेही सुरू राहिल्यास आर्थिक नुकसान सोसावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पन्न वाढावे व खर्च बचतीसाठी यावर उपाय म्हणून पूर्ण प्रवासी क्षमतेने एसटी चालवण्याच्या विचारात महामंडळ आहे. त्यासाठी दोन आसनांवर बाजूबाजूला बसलेल्या प्रवाशांमध्ये पडदे बसवण्यात येणार आहेत.
यासंदर्भात एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी हा प्रस्ताव गेल्या आठवड्यात राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे दोन बसमध्ये पडदे बसवण्यात आले असून राज्य सरकारकडून मंजुरी मिळताच त्याची चाचपणी केली जाणार असल्याचे सांगितले.
टाळेबंदीआधी एसटीच्या १८ हजार बसमधून दररोज ६० ते ६५ लाख प्रवासी प्रवास करत असल्याने त्यातून दररोज २१ ते २२ कोटी रुपये उत्पन्नही मिळत होते. परंतु गेल्या पाच महिन्यांत हेच उत्पन्न पूर्णपणे बुडाले. त्यामुळे एसटी पूर्ण क्षमतेने चालवतानाच खर्चातही बचत करण्याचा प्रयत्न आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .