| इंदापूर / महादेव बंडगर | कर्मयोगी स्वर्गीय शंकरराव पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर मला एका वेगळ्या सामाजिक, राजकीय व्यक्तीमत्वाची अनुभूती येते. असे प्रतिपादन निरा भीमा साखर कारखान्याचे संचालक,युवा नेते राजवर्धन पाटील यांनी केले आहे.
माजी मंत्री शंकरराव पाटील यांच्या 14 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त इंदापूर कॉलेजमध्ये त्यांच्या समाधी स्थळावर दर्शन घेतल्यानंतर त्यांनी ही भावना व्यक्त केली. कर्मयोगी भाऊ (आजोबा) हे माझ्यासाठी नेहमीच एक विचार, एक शुद्ध आचार, एक प्रेरणाशक्ती, दिव्यत्वाची अनुभूती आणि समाजाप्रती असणारी जाणीव आणि जागृती आहे. आज मी जेव्हा तालुक्यामध्ये सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्य करत असताना कर्मयोगी भाऊ आजोबांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना भेटतो तेव्हा त्यांच्या आठवणी लोक ज्या आत्मयतेने मांडतात, त्यातून मला सामाजिक कार्य करण्याची ऊर्जा मिळत असते असेही ते म्हणाले.
भाऊंच्या कुळात आपला जन्म झाला याचे समाधान आणि अभिमान वाटतो. आदरणीय कर्मयोगी भाऊंना शत शत नमन करून कर्मयोगिंच्या विचाराचे बंधन बांधून आज मी कृतकृत्य झालो.अशी भावना याप्रसंगी राजवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.
- वसुली करणाऱ्यांना वसुली सोडून तसेही दुसरे काही सुचते असे नाहीच.
- निंबाळकर VS मोहिते पाटील; माढा मतदारसंघात कोणाचे वर्चस्व, कोणाकडे किती संपत्ती ?
- बारामतीमधून ‘शरद पवार’ही मैदानात, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एकच चर्चा
- ‘एका व्यक्तीची इच्छा..’; संविधान बदलण्यासाठी ‘रामायण’ फेम गोवील यांचा पाठिंबा?
- तिसरीच्या विद्यार्थ्याची स्कूल फी 30 हजार रुपये, सोशल मीडियात पालकांचा रोष