| मुंबई | भारतात मोबाइल प्रोडक्शन करणाऱ्या काही कंपन्या आहेत, पण मोबाइल पार्ट्स अजूनही बाहेरुनच मागवावे लागतात. ही समस्याही आता लवकरच सुटण्याची शक्यता आहे. टाटा समूहाची कंपनी टाटा सन्स आता देशातच मोबाइलचे पार्ट्स बनवण्याच्या तयारीत आहे.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतातच मोबाइलचे पार्ट्स बनवण्यासाठी टाटा सन्स तामिळनाडूमध्ये मोठा प्रकल्प उभारणार आहे. या योजनेत टाटा समूह तब्बल 1.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. तर, टाटा समूह या योजनेसाठी 1.5 अब्ज डॉलर्सचे कर्ज घेणार असल्याचंही एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. यातील 75 कोटी डॉलर्स ते एक अब्ज डॉलर्सपर्यंतची रक्कम कंपनी एक्स्टर्नल कमर्शियल बॉरोईंगद्वारे (ECB) जमवणार आहे.
नव्या प्रकल्पासाठी कंपनी सीईओच्या शोधात असून टाटाच्या या नव्या प्रकल्पात सर्वप्रथम आयफोनचे पार्ट्स बनवले जातील असं सांगितलं जात आहे. दरम्यान, भारतीय मार्केटमध्ये दर्जेदार मेड इन इंडिया स्मार्टफोन उपलब्ध नसल्याने चिनी कंपन्यांची देशात मक्तेदारी वाढल्याचं बोललं जातं. जर, भारत या क्षेत्रात आत्मनिर्भर झाला तर त्याचा देशाला फायदा होईलच सोबतच चीनलाही मोठा फटका बसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
- सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा
- लोकसभा निवडणुकीत मतदानात होतेय हेराफेरी ? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचं सत्य
- कंपनी असावी तर अशी… IT कंपनीने बाजारपेठेत उडवली खळबळ, लाभांशाची करणार लयलूट
- मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका
- वसुली करणाऱ्यांना वसुली सोडून तसेही दुसरे काही सुचते असे नाहीच.