
| ठाणे | गेली १४ वर्षे पक्षात कार्यरत असणारे मनसेचे ठाणे शहर सचिव यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून निर्णय घेतल्याचे अनिल म्हात्रे यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे. याच कारणावरून डॉ. ओमकार माळी यांनीही राजीनामा दिला होता. आता त्यांच्यापाठोपाठ अनिल म्हात्रे यांनीही राजीनामा दिला आहे.
पक्षात एकाधिकारशाही वाढली असून एका विशेष गटाचे प्राबल्य वाढले आहे. १४ वर्षे निष्ठेने काम करणाऱ्यांची घुसमट होत आहे. पक्षाच्या वाईट काळात आम्ही टिकून राहिलो, असे अनिल म्हात्रे यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे. अनिल म्हात्रे यांच्यासह दहा जणांनी या राजीनाम्यावर सही केली आहे. दरम्यान, अनिल म्हात्रे हे आमच्या पक्षातील प्रामाणिक मनसे कार्यकर्ते आहेत. त्यांची घुसमट समजून घेऊन पक्ष त्यांची नाराजी दूर करेल, असे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.
गेले दीड वर्षांपासून मला आणि माझ्या सहकाऱ्यांना पक्षात त्रास होत आहे. पक्षात डावलणे, अपमानित करणे, हेतुपूर्वक टाळणे, अंतर्गत दबावतंत्र वापरणे हे सर्व प्रकार घडत आहेत. काही गोष्टी बोलण्यासारख्या नसतात. लोकांची कामेही होत नव्हती. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे अनिल म्हात्रे म्हणाले.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री