
| मुंबई | कोरोना महामारीमुळे आणि लॉकडाऊनमुळे पंचवटी एक्स्प्रेस गेल्या पाच महिन्यांपासून बंद होती. अखेर १७४ दिवसांनी ही एक्स्प्रेस पुन्हा रुळावर धावली आहे. मनमाड —नाशिक—मुंबई ही उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वपूर्ण आहे. आता ही ट्रेन पुन्हा सुरू झाल्याने नाशिककरांनी समाधान व्यक्त केले आहे. परंतु आता पंचवटी एक्स्पेसमधून प्रवास करण्यासाठी आरक्षण करणे बंधनकारक असणार आहे. पंचवटी एक्सप्रेसला पूर्वी जे थांबे होते तेच कायम राहणार आहेत.
आजपासून सुरू झालेल्या पंचवटी एक्स्प्रेसच्या आरक्षणाची सुरूवात १० सप्टेंबरपासून करण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे या गाडीने प्रवास करायचा असल्यास त्याचे आधीच नियोजन करावे लागणार आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने अनेक नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. यामध्ये, प्रवाशांना दीड तास अगोदर रेल्वेस्थानक परिसरात हजर राहावे लागणार आहे. आरक्षण असलेल्या प्रवाश्यांना या रेल्वेने प्रवास करता येणार आहे. प्रवासादरम्यान मास्क घालणे बंधनकारक असणार आहे.
पंचवटी एक्सप्रेस पुन्हा सुरू झाल्यामुळे रेल्वे प्रवासी, चाकरमाने, विद्यार्थी, उद्योजक आणि व्यावसायिकांची सोय होणार आहे. कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून सर्वच व्यवसाय आणि उद्योग बंद होते. त्यामुळे देशाची आर्थिक घडी देखील विस्कयली आहे. मात्र अनलॉक प्रक्रियाच्या माध्यमातून परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसत आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री