
| मुंबई | “मिशन बिगिन अगेन”अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवले जात आहेत. त्यास अनुसरून राज्यात खासगी बसेसना १००% टक्के प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. जे प्रवासी मास्क वापरणार नाहीत त्यांना प्रवास करता येणार नाही. याबाबतचे परिपत्रक गृह विभागाने शुक्रवारी जारी केले. कोरोनामुळे राज्यात खासगी वाहतुकीवर निर्बंध घातले होते. काही काळानंतर खासगी वाहतुकीस ३०% प्रवासी क्षमतेने परवानगी दिली होती.
आता १०० टक्के क्षमतेने प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली आहे. यात सर्व प्रकारच्या खासगी, कंत्राटी वाहनांचा समावेश आहे. तथापि, खबरदारी म्हणून काही उपाययोजना, नियमांचे पालन करावे लागणार आहे. परिवहन विभागाच्या सूचनांचे पालन करावे लागणार आहे. एका फेरीनंतर वाहनाचे निर्जंतुकीकरण करावे लागेल. बसचे आरक्षण, नियंत्रण कक्ष, कर्मचारी, कार्यालयाचे निर्जंतुकीकरण आवश्यक आहे. तसेच कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर आदींचा वापर करणे आवश्यक आहे. प्रवासादरम्यान नाष्टा, जेवण करतेवेळी तेथील ठिकाण, उपाहारगृहे निर्जंतुकीकरण केलेली असावीत.
- ह्युमन सर्वर मल्टीपर्पज ऑर्गायझेशनला (H.S.M.O) सामाजिक कार्याचा नवरत्न पुरस्कार जाहीर..!
- भाजपचे माजी मंत्री श्री परिणय फुके यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ‘ हे ‘ आवाहन..!
- सर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार
- वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर न झाल्यास जि.प. समोर धरणे आंदोलन; जुनी पेन्शन संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात..
- नेते अविनाश दौंड यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर..!