भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा अजब तर्क, शेतकरी आंदोलनामागे चीन व पाकिस्तान असल्याचा दावा..!

| जालना | सध्या देशभर नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. परंतू, या आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा अजब दावा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

जालन्यातील एका कार्यक्रमादरम्यान दानवे बोलत होते. यावेळे ते म्हणाले की, हे आंदोलन सुटा बुटातल्या लोकांचे आहे. केंद्र सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूनेच आहे. सध्या दिल्लीत जे आंदोलन सुरू आहे, त्यात पाकिस्तान आणि चीनचा हात आहे. याच देशांनी CAA च्या नावाखाली मुस्लिम समाजाला उचकवले होते. आता भारतातील शेतकऱ्यांनी याचा विचार करायला हवा, असे आवाहन देखील दानवे यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *