
| मुंबई | गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाने मुंबईकरांना थोडा दिलासा दिला आहे. तलाव क्षेत्रात आता सात लाख ५१ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे. हा जलसाठा पुढील १९७ दिवस म्हणजे साडेसहा महिने मुंबईची तहान भागवू शकेल. मात्र तलावांमध्ये आणखी ४८ टक्के जलसाठा कमी असल्याने २० टक्के पाणीकपात अशीच सुरू राहणार आहे.
मुंबईला दररोज तीन हजार ८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र गतवर्षीच्या तुलनेत तलावांमध्ये यंदा निम्म्याहून कमी जलसाठा आहे. त्यामुळे ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.
दरम्यान, ऑगस्ट महिन्यात पावसाने तलाव क्षेत्रात चांगला जोर धरला आहे. परिणामी, एका आठवड्यात तलावांची पातळी १५ टक्क्यांनी वाढली आहे. वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तलाव क्षेत्रात १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे़.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री