![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2020/11/IMG-20201126-WA0018.jpg?resize=880%2C528&ssl=1)
| मुंबई | कोरोना महामारीची ढाल पुढे करुन केंद्र व राज्य शासनाने अनेक कामगार-कर्मचारी विरोधी धोरणे राबविण्यास सुरुवात केल्याच्या निषेधार्थ देशभरातील २५ कोटी कामगार-कर्मचारी श्रमिक शेतमजूर यांनी आज संप केला होता. राज्यात मंत्रालयासह सर्व जिल्हयातील सरकारी कार्यालये आणि शाळा बंद होत्या. शासकीय मुद्रणालये, मोटार परिवहन विभाग, वस्तु व सेवा कर विभाग, जिल्हाधिकारी कार्यालये, मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग, तंत्र शिक्षण विभाग, कामगार आयुक्त कार्यालय, धर्मादाय आयुक्त कार्यालय, विमा संचालनालय अधिदान व लेखा कार्यालय, आरोग्य भवन, विज्ञान संस्था, कला संचालनालय, मस्त्य विभाग, सार्वजनिक पाटबंधारे व बांधकाम विभाग, शासकीय दुग्धशाळा, शासकीय महाविद्यालये, विविध शासकीय संचालनालयातील कर्मचारी या संपात संपूर्णत: सहभागी झाल्याची माहिती बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी दिली.
या संपाची तीव्रता आणि कर्मचाऱ्यांचा असंतोष लक्षात घेऊन राज्य सरकारने तातडीने संघटनेला चर्चेला बोलवावे असेही श्री. अविनाश दौंड यांनी सांगितले. हा एक दिवसीय संप हा पुढील मोठया लढयाची सुरवात असून सरकारने त्याची योग्यती दखल वेळीच घ्यावी असे संघटना अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी सांगितले.
- सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा
- लोकसभा निवडणुकीत मतदानात होतेय हेराफेरी ? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचं सत्य
- कंपनी असावी तर अशी… IT कंपनीने बाजारपेठेत उडवली खळबळ, लाभांशाची करणार लयलूट
- मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका
- वसुली करणाऱ्यांना वसुली सोडून तसेही दुसरे काही सुचते असे नाहीच.
e7JfyqxE4lsbqQ