
| मुंबई | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने सांगितल्याप्रमाणे २१ सप्टेंबरला शाळा चालू करण्यात येणार आहेत का?, यावर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकडवाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शिक्षण विभागाने संस्था चालकांची बैठक घेतली या बैठकीमध्ये २१ सप्टेंबरला शाळा चालू करण्यास संस्था चालकांनी स्पष्टपणे नकार दिला असून याबाबतचा निर्णय दिवाळीनंतरच घेतला जाणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
केंद्राने इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शाळा चालू करण्याचे निर्देश दिले. याबाबतची एसओपीही जाहीर करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या आणि वाढत चाललेला प्रादुर्भाव हे सर्व पाहता २१ सप्टेंबरला शाळा चालू करणं योग्य नाही, अशी भूमिका घेत सर्व संस्ठाचालकांनी दिवाळीनंतरत यासंदर्भातील निर्णय घ्यावा अशी मागणी केली.
दरम्यान, ग्रामीण भागातही कोरोना रूग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे निवासी शाळा तर अजिबात चालू करू नयेत. मागच्या वर्षी आलेले वेतेनेतर अनुदान आता सॅनिटायझर, निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता साहित्य खरेदीसाठी तातडीने द्यावी, अशी मागणीही बैठकीदरम्यान करण्यात आली..
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री