
| मुंबई | महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर हवा, असे म्हणत संजय राऊत यांनी आज ‘रोखठोक’मधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साद घातली आहे. याला राज ठाकरे यांनी उत्तर दिलेले नाही. मात्र संदीप देशपांडे यांनी यावर त्यांचे मत मांडले आहे. मी जे बोलतोय ती पक्षाची अधिकृत भूमिका नाही तर ते माझे मत आहे. पक्षाची अधिकृत भूमिका राज ठाकरे मांडतील असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यानंतर ते म्हणाले, ‘महाभारतामध्ये कर्णाच्या रथाचं चाक जेव्हा जमिनीत रुतलं होतं तेव्हा कृष्णाने कर्णाला जो प्रश्न विचारला तोच मला आज शिवसेनेला विचारायचा आहे. अभिमन्यू जेव्हा एकटा लढत होता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म कर्णा?’ असा प्रश्न विचारत संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांच्या आवाहनाला रोखठोक उत्तर दिले आहे.
- नकळत सारे घडते..!
- मैं अपनी फेव्हरेट हूँ..!
- “पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!
- २०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!
- पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर !’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..!