
| मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनबाबत सतत बोलत आहेत. त्यामुळे ते चीनमध्ये लोकप्रिय ठरले आहेत, असे म्हणत माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर खोचक टीका केली आहे.
पुढे ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी चीनबाबत सातत्याने बोलताहेत. त्यामुळे ते चीनमध्ये लोकप्रिय ठरले आहेत. चीनने भारतीय भूभागात घुसखोरी केली नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले, पण त्यांच्या या वक्तव्यामुळे भारतीय जवानांचं मनोबल ढासळलं आहे, असा आरोपही चव्हाणांनी मोदींवर केला.
गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांबरोबर झालेल्या झटापटीवर आम्हाला चिंता आहे आणि सीमेवर तैनात असलेल्या जवानांप्रती आम्हाला अभिमानही आहे, असं मोदींनी म्हटलं होतं.
तर सीमेचं रक्षण करणं आणि घुसखोरी रोखणं ही सरकारची प्रमुख जबाबदारी आहे. काँग्रेसने हा मुद्दा सातत्याने उचलून धरला. पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचीही खंत यावेळी चव्हाण यांनी बोलून दाखवली.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री