| मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनबाबत सतत बोलत आहेत. त्यामुळे ते चीनमध्ये लोकप्रिय ठरले आहेत, असे म्हणत माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर खोचक टीका केली आहे.
पुढे ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी चीनबाबत सातत्याने बोलताहेत. त्यामुळे ते चीनमध्ये लोकप्रिय ठरले आहेत. चीनने भारतीय भूभागात घुसखोरी केली नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले, पण त्यांच्या या वक्तव्यामुळे भारतीय जवानांचं मनोबल ढासळलं आहे, असा आरोपही चव्हाणांनी मोदींवर केला.
गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांबरोबर झालेल्या झटापटीवर आम्हाला चिंता आहे आणि सीमेवर तैनात असलेल्या जवानांप्रती आम्हाला अभिमानही आहे, असं मोदींनी म्हटलं होतं.
तर सीमेचं रक्षण करणं आणि घुसखोरी रोखणं ही सरकारची प्रमुख जबाबदारी आहे. काँग्रेसने हा मुद्दा सातत्याने उचलून धरला. पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचीही खंत यावेळी चव्हाण यांनी बोलून दाखवली.
- सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा
- लोकसभा निवडणुकीत मतदानात होतेय हेराफेरी ? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचं सत्य
- कंपनी असावी तर अशी… IT कंपनीने बाजारपेठेत उडवली खळबळ, लाभांशाची करणार लयलूट
- मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका
- वसुली करणाऱ्यांना वसुली सोडून तसेही दुसरे काही सुचते असे नाहीच.