
| अहमदनगर | राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या एकूण जागांपैकी ४ जागा काँग्रेस पक्षाच्या वाट्याला येणार असल्याची शक्यता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बोलून दाखवली आहे. आत्तापर्यंत ३५० जणांची यादी माझ्याकडे आली असल्याचं त्यांनी सांगितलंय. संगमनेर शहरातील एका उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कोरोना संसर्गाला सोप्प समजण्याची चूक न करण्याचं आवाहन महसूल मंत्री थोरात यांनी भाषणातून केलं.
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज संगमनेर या आपल्या मतदार संघात दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या हस्ते शेम्प्रो या संस्थेच्या इमारत व ट्रॅक्टर शो रुमचा उद्घाटन सोहळा पार पडला. नियोजित वेळेपेक्षा जास्त उशीर झाल्यानंतर थोरात यांनी उशीर होण्या मागचं कारण भाषणातून सांगितलं. राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या एकूण जागांपैकी ४ जागा काँग्रेसच्या वाट्याला येणार असल्याची शक्यता बाळासाहेब थोरात यांनी बोलून दाखवली. आत्तापर्यंत ३५० जणांची यादी माझ्याकडे आली असल्याच सांगत आजही अनेक इच्छुक आले असल्यानं कार्यक्रमाला उशीर झाल्याचं स्पष्ट केलं.
काय आहे विधानपरिषदेचं पक्षीय बलाबल?
राष्ट्रवादी काँग्रेस – १०
काँग्रेस – ८
शिवसेना – १४
भाजप – २३
लोकभारती – १
शेतकरी कामगार पक्ष – १
राष्ट्रीय समाज पक्ष – १
अपक्ष – ६
रिक्त – १४
एकूण – ७८
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री