
| अहमदनगर | राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या एकूण जागांपैकी ४ जागा काँग्रेस पक्षाच्या वाट्याला येणार असल्याची शक्यता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बोलून दाखवली आहे. आत्तापर्यंत ३५० जणांची यादी माझ्याकडे आली असल्याचं त्यांनी सांगितलंय. संगमनेर शहरातील एका उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कोरोना संसर्गाला सोप्प समजण्याची चूक न करण्याचं आवाहन महसूल मंत्री थोरात यांनी भाषणातून केलं.
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज संगमनेर या आपल्या मतदार संघात दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या हस्ते शेम्प्रो या संस्थेच्या इमारत व ट्रॅक्टर शो रुमचा उद्घाटन सोहळा पार पडला. नियोजित वेळेपेक्षा जास्त उशीर झाल्यानंतर थोरात यांनी उशीर होण्या मागचं कारण भाषणातून सांगितलं. राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या एकूण जागांपैकी ४ जागा काँग्रेसच्या वाट्याला येणार असल्याची शक्यता बाळासाहेब थोरात यांनी बोलून दाखवली. आत्तापर्यंत ३५० जणांची यादी माझ्याकडे आली असल्याच सांगत आजही अनेक इच्छुक आले असल्यानं कार्यक्रमाला उशीर झाल्याचं स्पष्ट केलं.
काय आहे विधानपरिषदेचं पक्षीय बलाबल?
राष्ट्रवादी काँग्रेस – १०
काँग्रेस – ८
शिवसेना – १४
भाजप – २३
लोकभारती – १
शेतकरी कामगार पक्ष – १
राष्ट्रीय समाज पक्ष – १
अपक्ष – ६
रिक्त – १४
एकूण – ७८
- ह्युमन सर्वर मल्टीपर्पज ऑर्गायझेशनला (H.S.M.O) सामाजिक कार्याचा नवरत्न पुरस्कार जाहीर..!
- भाजपचे माजी मंत्री श्री परिणय फुके यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ‘ हे ‘ आवाहन..!
- सर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार
- वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर न झाल्यास जि.प. समोर धरणे आंदोलन; जुनी पेन्शन संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात..
- नेते अविनाश दौंड यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर..!