| कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने यशवंतराव चव्हाण पंचायत राज समिती मध्ये राज्यात कोल्हापूर जिल्हा प्रथम व तालुक्यात कागल तालुका दुसऱ्या क्रमांकावर आल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकासमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी त्यांचे समन्वय समितीचे नेते मोहन भोसले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले .
यावेळी संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांनी “बदल्यांचा आदेश अजून निघालेला नाही. बदल्या मे मध्ये होणार की नाही अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये अस्वस्थता आहे.” अशी साहेबाना विचारणा केली.
यावेळी ना. मुश्रीफ म्हणाले, की “कोणत्याही परिस्थिती मध्ये मे महिन्यातच बदल्या होतील. पुढील आठवड्यात बदल्यांचा आदेश नक्की बाहेर पडेल. या बदल्याच्या शासन निर्णयामध्ये संघटनांनी सुचवल्याप्रमाणे सुधारणा करणेत आलेल्या आहेत. शिक्षकांच्या जास्तीत जास्त सोयी होतील असा या सरकारचा पूर्ण प्रयत्न आहे.”
एकंदरीत, यामुळे जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या मे मध्ये होतील अशी आशा व्यक्त होत आहे.
- सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा
- लोकसभा निवडणुकीत मतदानात होतेय हेराफेरी ? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचं सत्य
- कंपनी असावी तर अशी… IT कंपनीने बाजारपेठेत उडवली खळबळ, लाभांशाची करणार लयलूट
- मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका
- वसुली करणाऱ्यांना वसुली सोडून तसेही दुसरे काही सुचते असे नाहीच.
सर 16 वर्षे झाली आदिवासी नक्षलग्रस्थ पेसा क्षेत्रात कार्यरत आहे .साहेबांनी बदली करावी ही विनंती