| मुंबई | महाविकास आघाडीचे सरकार असून विश्वासात न घेता लॉकडाऊन वाढवल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याची चर्चा होत आहे. मिशन बिगीन अगेनची घोषणा करून पुन्हा लॉकडाऊन कायम ठेवल्याबाबत महाविकास आघाडीतल्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. निर्णय घेण्याआधी मंत्र्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार त्यांनी केली असल्याचे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून समजत आहे. दरम्यान, प्रशासकीय अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचं काही मंत्र्यांचं मत आहे.
महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्याकडे याबाबत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. आज सकाळी शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत चर्चा देखील केली. नाराजी दूर करण्यासाठी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात उद्या भेट होण्याची शक्यता आहे.
याआधी निर्णय प्रक्रियेत सहभाग नसल्याचं कारण देत काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होता. त्यामुळे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
- सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा
- लोकसभा निवडणुकीत मतदानात होतेय हेराफेरी ? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचं सत्य
- कंपनी असावी तर अशी… IT कंपनीने बाजारपेठेत उडवली खळबळ, लाभांशाची करणार लयलूट
- मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका
- वसुली करणाऱ्यांना वसुली सोडून तसेही दुसरे काही सुचते असे नाहीच.