
| मुंबई | गेल्या काही दिवसांपासून रिपरिप पडणा-या पावसाने मंगळवारी मुंबईत जोरदार हजेरी लावली. दुपारनंतर मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड यासारख्या कोकण किनारपट्टी भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईत मंगळवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र दुपारनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुंबईत लोअर परळ, वरळी, दादर, माटुंगा, किंग्ज सर्कल या भागात जोरदार पाऊस पाहायला मिळत आहेत. तर उपनगरात अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली या ठिकाणीही मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले होते.
कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड भागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्गात सकाळपासूनच पावसाची रिपरिप पाहायला मिळाली. कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे.
सिंधुदुर्गात आतापर्यंत ३९१ मिमी पाऊस झाला. तर मालवण तालुक्यात सर्वाधिक ११२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. यानुसार १५ ते १७ जुलैपर्यंत कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री