
| उल्हासनगर | कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने उल्हासनगरातील कोविड रुग्णांच्या उपचाराठी सत्य साई प्लॅटिनियम रुग्णालयात ३०० बेडची सोय करण्यात आली आहे. हे रुग्णालय डेडीकेटेड कोविड रुग्णालय आहे. या आरोग्य सुविधेमुळे एकाचवेळी ३०० कोविड रुग्णांवर उपचार करणो शक्य होणार आहे. अवध्या दहा दिवसात हे रुग्णालय उभे केले आहे. त्यात सध्या पहिल्या टप्प्यात २०० बेड सज्ज आहे. आवश्यकता भासल्यास व रुग्ण वढल्यास आणखीन १०० बेडची तयारी ठेवली आहे.
२०० बेडवरील रुग्णांना ऑक्सीजनची सुविधा आहे. तसेच ३० बेडला व्हेटिंलेटरची सुविधा पुरविण्यात आली आहे. याशिवाय कोविड झालेल्या व डायलेसिस असलेल्या रुग्णाला अन्य रुग्णालयात डायलेसिस केले जात नाही. डायलेलीस कोविड रुग्णही या रुग्णालयात उपचार घेऊ शकतात. सहा डायलेसिस रुग्णांकरीता ही सोय या ठिकाणी उपलब्ध करुन दिली आहे. त्यांच्याकरीता सहा बेड राखून ठेवण्यात आलेले आहेत. ऑपरेशन थिएटरची सुविधा याठिकाणी आहे. या रुग्णालयात वैद्यकीय स्टाफही देण्यात आला आहे. १२ डॉक्टर, ४० नर्स व अन्य १२० जणांचा स्टाफ या ठिकाणी रुग्णांची सेवा करणार आहे.
ठाणे, नवी मुंबई, अंबरनाथ, कल्याण या ठिकाणी कोविड रुग्णालये उभी केली जात आहे. त्याठिकाणी वैद्यकीय स्टाफची कमी होऊ नये यासाठी नर्सना दुप्पट पगार दिला जात आहे. त्यामुळे स्टाफची कमतरता भासणार नाही असा दावा खासदार शिंदे यांनी केला आहे. यावेळेस सदर रुग्णालयाची पाहणी दरम्यान महानगरपालिका आयुक्त समीर उन्हाळे, शिवसेना सभागृह नेते राजेंद्र चौधरी, उपमहापौर भगवान भालेराव, नगरसेवक धनंजय बोराडे, नगरसेवक अरुण आशाण, उपस्थित होते.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री