| मुंबई / नवी दिल्ली | भारतीय वेबसाईट आणि वृत्तपत्रांवर बंदी घातली आहे. भारताने चीनच्या ५९ ॲपवर बंदी आणण्यापूर्वीच चीनने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात माहिती दिली आहे.
चीनचे मुखपत्र असणारी वर्तमानपत्रे आणि वेबसाईटवरील बातम्या भारतीय वेबसाईटवर प्रसिद्ध होतात. तसेच पूर्व लडाखमधील सीमावादाशी संबंधित सर्व घडामोडींची माहिती भारतीय प्रसारमाध्यमे प्रसिद्ध करत आहेत. चीनमधील लोकांना भारतीय माध्यमांद्वारे योग्य माहिती मिळू नये, अशी भीती चीनला वाटत आहे.
चीनमधील मीडिया नियंत्रण हे सरकारचे (चीनमधील ऑनलाईन मीडिया सेन्सॉरशिप) म्हणजे सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या हातात आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या संमतीशिवाय कोणीही काहीही लिहू शकत नाही. पण भारतीय मीडिया स्वतंत्र आहे. त्यामुळे भारतीय माध्यमांमध्ये दररोज गलवान खोऱ्याबद्दलच्या बातम्या येत असतात. याच बातम्या चीनमधील जनतेला समजू नये, हे या बंदीचे कारण असल्याचे सांगितले जाते.
- वसुली करणाऱ्यांना वसुली सोडून तसेही दुसरे काही सुचते असे नाहीच.
- निंबाळकर VS मोहिते पाटील; माढा मतदारसंघात कोणाचे वर्चस्व, कोणाकडे किती संपत्ती ?
- बारामतीमधून ‘शरद पवार’ही मैदानात, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एकच चर्चा
- ‘एका व्यक्तीची इच्छा..’; संविधान बदलण्यासाठी ‘रामायण’ फेम गोवील यांचा पाठिंबा?
- तिसरीच्या विद्यार्थ्याची स्कूल फी 30 हजार रुपये, सोशल मीडियात पालकांचा रोष