
| कल्याण | कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी आमदारांनी शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची मागणी पार पडलेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीत केली आहे. किमान १० ते १५ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात यावा अशी मागणी केली आहे. आयुक्तांच्या पातळीवर शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
कल्याण अत्रे रंगमंदिरात कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॉन्फरन्स हॉलमध्ये बैठक घेतली. अनलॉक-वनमध्ये शहरातील जनजीवन पुन्हा सुरु झाले होते. लोकांना दिलासा मिळाला होता. मात्र शेजारच्या भिवंडी महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने महासभेने शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतही कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्याने मृतांचा आकडा ६९ वर पोहचला आहे. कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा १५ दिवसाचा लॉकडाऊन लागू करावा अशी मागणी मनसेचे आमदार पाटील यांनी केली.
या मागणीला आमदार चव्हाण, गायकवाड, भोईर यांनी उचलून धरले. या मागणीचा विचार प्रशासनाने करावा अशा सूचना पालकमंत्री शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत. यावेळी आयुक्तांसह महापौर विनिता राणे, खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री