
| मुंबई | कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने शहरातील कचरा कमी करण्यासाठी एक नवीन शक्कल लढवली आहे. केडीएमसी कडून राबवण्यात येणाऱ्या या योजनेतून शहरातील कचरा तर साफ होईलच पण त्याचबरोबर गरीबांना अन्न देखील मिळणार आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने प्लॅस्टिक कचरा शहरातून संपवण्यासाठी ही नवी योजना आखली आहे. 5 किलो प्लॅस्टिक कचरा गोळा करणाऱ्याला जेवणाचे कूपन देण्याची ही योजना आहे. दीर्घकाळापासून कल्याण-डोंबिवली आणि परिसरातील इतर शहरांमध्ये कचऱ्याची गंभीर समस्या आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालिकेने ही नामी युक्ती शोधली आहे.
‘झिरो वेस्ट’ पॉलिसीअंतर्गत फूड कूपन योजनेची आखणी :
केडीएमसीच्या ‘झिरो वेस्ट’ धोरणाचा एक भाग म्हणून ही योजना सुरू केली गेली आहे, असे व्यवस्थापन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले, ‘नवीन उपक्रमाचा एक भाग म्हणून आम्ही नागरिकांना प्लास्टिक कचरा गोळा करण्याचे आवाहन केले आहे. एखाद्या केंद्राला 5 किलो प्लास्टिक कचरा दिल्यास त्या बदल्यात त्यांना ‘पोळी-भाजी’ (चपाती-भाजी) साठी कूपन मिळेल. याची किंमत 30 रुपये असेल. त्यांनी अशी माहिती दिली आहे की, बाजारांव्यतिरिक्त केडीएमसीने विविध ठिकाणी असणाऱ्या वेस्ट कलेक्शन सेंटरबरोबर मिळून ही योजना आखली आहे.
केडीएमसीचं असं उद्दिष्ट्य आहे की, कल्याण-डोंबिवलीला कचरामुक्त करायचं. ‘झिरो वेस्ट’चं ध्येय पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे. यासह संपूर्ण देशासाठी एक उदाहरण द्यायचे आहे की, एकीकडे शहरातील कचरा साफ करता येईल आणि दुसरीकडे थोडी मेहनत घेतल्यानंतर शहरातील कुणीही भुकेलं राहणार नाही.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री