![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2020/05/images-50-2020-05-03T093828.921.jpeg?resize=639%2C480&ssl=1)
| मुंबई | देशासह राज्यांर्गत प्रवासाला शासनाने सशर्थ परवानगी दिली आहे. नियम, अटी पाळून नागरिक आपल्या इच्छित स्थळी जाऊ शकणार आहेत. असे असताना कोणाकडे अर्ज करायचा ? परवानगी कशी मिळवायची ? असे अनेक प्रश्न नागरिकांसमोर आहेत. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरातून दुसरीकडे जाऊ इच्छिणाऱ्या वा अशा शहरात येऊ पाहणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची बाब समोर येत आहे.
पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये (उदा. औरंगाबाद, नागपूर) आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना देण्यात आले आहेत.
असे असले तरीही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA क्षेत्र) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा त्या जिल्ह्यातून या प्राधिकरण क्षेत्रात येण्यास परवानगी नसणार आहे.
या दोन्ही प्राधिकरण क्षेत्रातून महाराष्ट्राबाहेर (विशेषत: मजुरांना) जाण्याच्या परवानगी आहे. अशा परवानगीसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात संपूर्ण माहितीसह मेडिकल प्रमाणपत्रासह अर्ज करता येईल. सर्व पोलीस ठाण्याची माहिती एकत्र करून त्या विभागांच्या पोलीस उपआयुक्तांकडे पाठविली जाणार आहे.
या अर्जाची छाननी करून नियमानुसार आणि तेथील कोविड १९ प्रादुर्भाव परिस्थितीचा विचार करून पुढची कार्यवाही केली जाणार आहे. अर्धवट किंवा अनाधिकृत किंवा ऐकीव दिल्या जाणाऱ्या माहितीवर विसंबून कोणीही धावाधाव करू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.