![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2020/05/IMG_20200515_131503.jpg?resize=839%2C528&ssl=1)
| पालघर | गडचिंचलेमध्ये झालेल्या साधू हत्याकांड प्रकरणी डहाणू न्यायालयात पीडितांची बाजू मांडण्यासाठी निघालेले वकील दिग्विजय त्रिवेदी यांचा मेंढवणच्या खिंडीत अपघाती मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या साधूंच्या पक्षात विश्व हिंदु परिषदेच्या वतीने बाजू मांडण्यासाठी वकील दिग्विजय त्रिवेदी हे सकाळी १० च्या सुमारास जात असताना अपघात झाला. त्रिवेदी हे कारमधून येत असताना कार वरील ताबा सुटला व ती रस्त्याच्या कडेला उलटली.
दरम्यान, गडचिंचले हत्या प्रकरणी आता आरोपींची संख्या १४१ झाली आहे. गुरुवारी सहा आरोपींना न्यायालयाने १९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आधीच अटकेत असलेल्या १०६ जणांपैकी पाच जणांना १६ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली. तर अन्य १०१ जणांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. तर त्यातील ४० जणांना तिसऱ्या गुन्ह्यात अटक केली असून त्यांना देखील १८ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
- सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा
- लोकसभा निवडणुकीत मतदानात होतेय हेराफेरी ? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचं सत्य
- कंपनी असावी तर अशी… IT कंपनीने बाजारपेठेत उडवली खळबळ, लाभांशाची करणार लयलूट
- मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका
- वसुली करणाऱ्यांना वसुली सोडून तसेही दुसरे काही सुचते असे नाहीच.
- निंबाळकर VS मोहिते पाटील; माढा मतदारसंघात कोणाचे वर्चस्व, कोणाकडे किती संपत्ती ?