
| पारनेर / स्थानिक प्रतिनिधी | पारनेर नगरपंचायतचे नगरसेवक पक्षांतर प्रकरणात लोकप्रतिनिधींचे हसू झाले असून अशा पद्धतीने पक्षांतर करणे योग्य नसून नगरसेवकांच्या पाण्याविषयीच्या तक्रारीत काहीच तथ्य नसल्याचे माजी विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी म्हणाले आहेत.
तसेच केवळ राजकारण करण्यासाठी काहीही कारणे देऊन पोरखेळ करत लोकप्रतिनिधींनी तालुक्याचे वाटोळे करू नये असा घणाघात माजी आमदार विजय औटी यांनी केला आहे. केवळ राजकारण करण्यासाठी पाण्याचा प्रश्न पुढे आला असून याबाबत आपण वरिष्ठांच्या संपर्कात असल्याचेही औटी यांनी सांगितले.
तसेच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात चांगले काम करत असताना अशा गोष्टींनी विरोधकांना टीका करण्यास जागा मिळते; दुसरे काही होत नाही असे पुढे बोलताना औटी म्हणाले.
दरम्यान, पारनेर नगरपंचायत क्षेत्रातील पाच नगरसेवकांनी केलेले पक्षांतर राज्यभर गाजले होते. थेट मातोश्रीवर त्या सर्वांची घरवापसी करण्यात आली. थोडक्यात निलेश लंके यांनी आपल्या गळाला नगरसेवक तर लावलेच लावले, परंतु पुन्हा तो निर्णय बदलण्याची वेळ आली तर थेट मातोश्रीवर जावून तो निर्णय बदलवला..! एकंदरीत या राजकीय नाट्यात आमदार लंके यांनी बाजी मारली, हे नाकारून चालणार नाही अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री
Aas tumhala watay pan satya paristhiti wegali aahe