
| सिंधुदुर्ग / लोकशक्ती ऑनलाईन | तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर सडकून टीका करणारे भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर शिवसेनेचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी जोरदार पलटवार केला आहे. नारायण राणे पनवती आहेत. म्हणूनच भाजपने त्यांना अडगळीत टाकल आहे, असा खोचक टोला विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना लगावला आहे. राणेंनी कोकणात केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याचा इशारा देखील राऊतांनी दिला आहे. सिंधुदुर्ग भवन कस बनलं. कोकणवासीयांना फसवून भूखंड कसा लाटला हे आम्ही लोकांना सांगणार असल्याचे राऊत म्हणाले.
खासदार विनायक राऊत यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, भाजपने पनवती म्हणून राणेंना अडगळीत टाकले आहे. त्यांना कावीळ झाली आहे. ते अजून कोकणातही गेलेले नाहीत. भ्रष्टाचाराचा महामेरू म्हणून राणेंचा उल्लेख होतो.
त्यांच्या रुग्णालयातच RT-PCR चाचणीसाठी जादा पैसे घेतले जात आहेत. भूखंड हडप करणारा म्हणजे नारायण राणे अशी टीका राऊतांनी केली आहे. मातोश्रीत शांती यज्ञ घालण्याचा सल्ला राणेंनी उद्धव ठाकरे यांना दिला होता. त्यावरही राऊतांनी निशाणा साधला. राणेंनी इतरांना सल्ला देऊ नये. आधी स्वत:च्या घरात शांती घालावी. वर्षा अन् मातोश्री ही दैवतांची घरे असून त्यावर बोलणे त्यांना शोभत नसल्याचे राऊत म्हणाले.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री