
| नवी दिल्ली | जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीमुळे प्रशासनाने अनेक बंधन लादली आहेत. सोशल डिस्टन्सिंग राखणं, मास्क लावणं, अशा अनेक नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.
मात्र आता लोक मास्क लावण्यासाठी टाळाटाळ करताना दिसत आहे. परंतू तरीसुद्धा आणखी काही काळ मास्क लावणं गरजेचं असल्याचं नीती आयोग सदस्य डाॅ. व्ही. के. पाॅल यांनी सांगितलं आहे.
पुढील काही काळ नाही तर पुढच्या वर्षापर्यंत मास्क घालणं गरजेचं असल्याचं डाॅ. पाॅल यांनी सांगितलं आहे. याबाबत बोलताना मास्क परिधान करणं आता बंद होणार नसून कोरोनाची तिसरी लाट नाकारता येणार नसल्याचंही पाॅल म्हणाले आहेत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत तसेच मास्कबाबत भाष्य करत असताना कोरोनाचा लढा आता केवळ शिस्त, लस आणि प्रभावी औषधांद्वारे जिंकला जाऊ शकतो. पुढील तीन-चार महिने अत्यंत महत्त्वाचे असल्याचं पाॅल यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, डाॅ. पाॅल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी उत्सावांमध्ये सुरक्षा कमी करण्याबाबत सावधगिरी बाळगण्यात यावी नाहीतर संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरु शकतो. कोरोनाची दुसरी लाट सध्या देशभर पसरत आहे. जर व्यवस्थितपणे काळजी घेतली तर तिसऱ्या लाटेचा धोका कमी होईल, असं सांगितलं.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री