| प्रयोगशील | रँचो ची भारतीय सैन्यांना उबदार भेट !

| नवी दिल्ली | थ्री इडियट्स हा हिंदी चित्रपट ज्यांच्यावर आधारीत होता अशा सोनम वांगचुक यांनी प्रचंड कडाक्याच्या थंडीतही देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय लष्कराच्या सैन्याना सौर उर्जेवर आधारीत उबदार तंबू बनवले आहेत या तंबूंच्या माध्यमातून कडाक्याच्या थंडीतही उब मिळणार आहे.

संशोधक व नवनिर्मितीचे ध्यास घेतलेले सोनम वांगचूक यांनी भारतीय लष्कराला लेह लडाख शीत प्रदेशातही सामान्य तापमानात राहता येईल अशा तंबूची निर्मिती केली आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये सौर उर्जेवर आधारीत तंबू उभारले जात असल्याचे सोनम वांगचूक यांनी समाज माध्यमांना माहिती दिली.

रात्री १० वाजता तंबू बाहेरील तापमान हे -१४ अंश सेल्सियस असताना तंबू मध्ये १५ अंश सेल्सियस तापमान स्थिर करण्यात येणे शक्य आहे . या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये केरोसिनचा वापर टाळता येणार आहे. प्रदूषण टाळणे शक्य होणार आहे.

या तंबू मध्ये ८ ते १० सैनिक राहू शकतात. या तंबूच्या साहित्याची ने -आण करणे सोपे आहे. याच्या प्रत्येक भागाचे वजन ३० किलोग्रॅम पेक्षा कमी आहे.पूर्णतः भारतीय बनावटीचे व लडाखमध्ये बनवलेले सर्व साहित्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *