
| मुंबई | लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडय़ांमधून उतरणाऱया प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थानांवर जाण्यासाठी बस आणि टॅक्सीच्या रांगेत ताटकळावे लागते. त्यामुळे प्रवाशांना आता ट्रेनमधून बसल्या जागी अॅपवर आपले आसन आरक्षित करता येणारी नवीन अॅप आधारित बससेवा सुरू होणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी आणि एलटीटी स्थानकातून या बस सेवेला प्रारंभ होणार आहे. मध्य रेल्वे आपल्याकडील मोकळी जागा या बससेवेसाठी खासगी कंपन्यांना भाडय़ाने उपलब्ध करून देणार आहे.
मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकातून कालच ई-बाईक बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथील लांबपल्ल्याच्या प्रवाशांना मुंबई शहरातील आणि उपनगरातील आपल्या घर आणि कार्यालयात जाण्यासाठी या अॅप आधारित बस सेवेचा उपयोग होणार आहे.
सीएसएमटी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. 18 च्या बाजूला आणि एलटीटी स्थानकाबाहेरही मोकळ्या जागेत या बसेस पार्क केल्या जाणार आहेत. एक बस पार्क करण्याएवढी जागा दिली जाणार आहे. या बदल्यात वार्षिक तीन लाख रुपये बेस फेअर कंपनीकडून आकारण्यात येणार आहे. यासाठी पुढच्या महिन्यात टेंडर खुले होणार असल्याचे सूत्रांनी सांगितल
या स्थानकांतून खासगी वाहतूक सेवा :
कुर्ला स्थानकात ई-बाईक सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. ठाणे स्थानक हद्दीत खासगी कंपन्यांना ई-रिक्षा सेवेसाठी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. आता सीएसएमटी, भायखळा, परळ, दादर, मुलुंड, भांडुप स्थानक हद्दीतही प्रवाशांसाठी खासगी कंपन्यांच्या माध्यमातून अशा प्रकारची वाहतूक सेवा देण्यात येणार आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री