
| मुंबई | स्थानिक स्वराज्य निवडणुकीत ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे भाजपच्या वतीने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन सुरू होत. नागपूरच्या व्हेरायटी चौक इथं भाजपकडून चक्का जाम आंदोलन करण्यात आलं होत. यावेळी आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधी पक्षनेत्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. आमच्या हाती सूत्र द्या, मी ओबीसींचं आरक्षण परत आणून दाखवतो. जर असं करून दाखवलं नाही तर राजकीय संन्यास घेईल, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.
मात्र यानंतर यावर आता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावर प्रतिक्रिया दिलीय. ‘देवेंद्र फडणवीस याचं विधान तुम्ही फार गांभीर्यानं घेतले. या आधीही त्यांनी स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही असे म्हटलं होते’.
‘देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवू असे, धनगर समाजाला सांगितले होते. पण पहिल्या बैठकीतही नाही व पाच वर्षातही धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. ते फक्त दिशाभूल करत गेले. सत्तेसाठी वारेमाप बोलायचे आणि वाट्टेल ते आश्वासन द्यायचे. नंतर मात्र ते कृतीतून करायचे नाही, असा अनुभव भाजपचा आपल्याला आधीपासूनच आहेच. जनमाणसाला फसवणे आणि सत्ता मिळवणे हा उद्देश ठेवून ते अशी वक्तव्य करतात,’ अशी टीका थोरात यांनी केली.
- “आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.!
- ह्युमन सर्वर मल्टीपर्पज ऑर्गायझेशनला (H.S.M.O) सामाजिक कार्याचा नवरत्न पुरस्कार जाहीर..!
- भाजपचे माजी मंत्री श्री परिणय फुके यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ‘ हे ‘ आवाहन..!
- सर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार
- वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर न झाल्यास जि.प. समोर धरणे आंदोलन; जुनी पेन्शन संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात..