
| नागपूर | रेल्वेने पहिल्यांदाच २.८ किमी लांबीची मालगाडी चालवून नवा इतिहास रचला आहे. या मालगाडीला २५१ डबे होते. सुपर पायथन ‘शेषनाग’ असे या मालगाडीला नाव देण्यात आले आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देखील ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.
शेषनाग Running on Track: Boosting freight transportation, Railways has run 251 wagons with 4 trains combined together, totalling to 2.8 km, between Nagpur & Korba. pic.twitter.com/UYrau3pfbi
— Piyush Goyal (@PiyushGoyal) July 2, 2020
भारतीय रेल्वेने चार मालगाड्यांना जोडून २.८ किमी लांबीची मालगाडी तयार करून ती चालवण्याचा विक्रम केला. २५१ डबे, व्हॅगन, ४ ब्रेक व्हॅन आणि ९ विद्युत लोको (इंजिन) या ट्रेनला जोडण्यात आले होते. छत्तीसगडमधील परमलकसा आणि दुर्ग या दोन स्टेशन दरम्यान ही ट्रेन चालवण्यात आली.
या मालगाडीने परमलकसा ते दुर्ग दरम्यानचे २२ किलोमीटरचे अंतर ४५ मिनिटात पूर्ण केले. परमलकसा येथून ही ट्रेन गुरुवारी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी सोडण्यात आली. ती १ वाजून ५ मिनिटांनी दुर्गला पोहोचली. ही मालगाडी दुर्गहून पुढे बिलासपूर आणि तेथून कोरबापर्यंत ही गेली. भविष्यात युद्धजन्य परिस्थितीत अन्न धान्य तसेच आवश्यक साहित्य पोहचविण्यासाठी या ट्रेनचा वापर होऊ शकतो. त्याच पार्श्वभूमीवर ही ट्रायल घेण्यात आली.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री