| नवी दिल्ली | सध्या पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये सीमावाद सुरु आहे. तिथे काही भागांमध्ये दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने उभे ठाकले आहे. यावरुन आता देशात राजकारण देखील पेटलं आहे. भारताचे गृहमंत्री अमित शाह यांना काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना शायराना अंदाजात उत्तर दिलं आहे. गालिबच्या सबको मालूम है जन्नत की हकीकत लेकीन.. या प्रसिद्ध शायरीवरुन प्रेरणा घेत राहुल गांधी यांनी, ‘सब को मालूम है ‘सीमा’ की हक़ीक़त लेकिन,दिल के ख़ुश रखने को, ‘शाह-यद’ ये ख़्याल अच्छा है’, असं ट्वीट त्यांनी केलं आहे. .(rahul Gandhi on amit shah)
सब को मालूम है ‘सीमा’ की हक़ीक़त लेकिन,
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 8, 2020
दिल के ख़ुश रखने को, ‘शाह-यद’ ये ख़्याल अच्छा है।https://t.co/cxo9mgQx5K
काल साधारण साडे चार वाजता गृहमंत्री अमित शाह यांनी चीन बरोबर सुरु असलेल्या सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या संरक्षण धोरणाचे समर्थन करत एक वक्तव्य केलं होतं. भारताच्या संरक्षण धोरणाला जागतिक मान्यता मिळाली आहे. अमेरिका आणि इस्रायलनंतर आपल्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी कुठला देश सक्षम असेल तर, तो भारत आहे. संपूर्ण जगाने हे मान्य केले आहे, असं अमित शाह यांनी बिहारमधील डिजिटल सभेला संबोधित म्हटलं होता. अमित शाह यांचे हे वक्तव्य कोट करत राहुल गांधी यांनी शायरीच्या माध्यमातून टोला लगावला आहे.
दरम्यान, भारत आणि चीनमध्ये लष्करी प्रोटोकॉलनुसार फील्ड स्तरावरची सर्वोच्च बैठक पार पडली. गेल्या महिनाभरापासून चीन सीमेवर वाढलेल्या तणावाचा प्रश्न संवादानं मिटवण्याचा प्रयत्न दोन्ही देशांकडून झाला. भारताकडून ले जनरल हरिंदर सिंह यांनी या बैठकीत सहभाग घेतला होता.(rahul Gandhi on amit shah)
- सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा
- लोकसभा निवडणुकीत मतदानात होतेय हेराफेरी ? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचं सत्य
- कंपनी असावी तर अशी… IT कंपनीने बाजारपेठेत उडवली खळबळ, लाभांशाची करणार लयलूट
- मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका
- वसुली करणाऱ्यांना वसुली सोडून तसेही दुसरे काही सुचते असे नाहीच.