
| नवी दिल्ली : प्रतिनिधी | गेले काही दिवस देशात रेल्वेच्या खासगीकरणावरून वाद सुरू आहे. यादरम्यान, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी एक मोठे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर जवळपास सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. रेल्वेचं कोणत्याही प्रकारे खासगीकरण करण्यात येणार नसल्याची माहिती पीयूष गोयल यांनी दिली.
पीयूष गोयल यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले की, कोणत्याही प्रकारे रेल्वेचे खासगीकरण केले जाणार नाही. सध्या सुरू असलेल्या रेल्वेच्या सेवा त्याच मार्गाने धावतील. खाजगी सहभागासह १०९ मार्गावर १५१ अतिरिक्त आधुनिक रेल्वे चालवल्या जातील. ज्याचा रेल्वे गाड्यांवर काहीही परिणाम होणार नाही. परंतु गाड्यांच्या आगमनाने रोजगार निर्माण होईल. त्यामुळे रेल्वेचे कोणत्याही प्रकारे खासगीकरण केले जात नाही, सध्या सुरू असलेल्या रेल्वेच्या पूर्वीप्रमाणेच सर्व सेवा सुरू राहतील, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
१०९ जोडी मार्गांवर खासगी रेल्वे सुरू करण्यासाठी रेल्वेने प्रस्ताव मागवले आहेत. संपूर्ण देशातील रेल्वेच्या जाळ्याला १२ कलस्टरमध्ये विभागण्यात आलं आहे. या १२ क्लस्टरमध्ये १०९ जोडी मार्गांवर खासगी गाड्या चालवल्या जाणार आहेत. प्रत्येक रेल्वेला कमीतकमी १६ डबे असतील. तर या ट्रेनचा सर्वाधिक वेग हा १६० किलोमीटर प्रति तास असेल. या ट्रेनचा रोलिंग स्टॉक खासगी कंपनी खरेदी करेल.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री