
| कोल्हापूर | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी हे आता विधान परिषदेच्या माध्यमातून आमदार होण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माझ्याशी चर्चा करताना विधान परिषदेचा प्रस्ताव दिला आहे. याबाबत दोन दिवसात आपण निर्णय घेणार आहोत.
मागच्या लोकसभेला भाजपा व मित्र पक्षांच्या सहकार्याने राजू शेट्टी यांनी निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांचे भाजपबरोबर संबंध बिनसले. मग त्यांनी थेट मोदींवर सुद्धा टीका केली. मागची लोकसभा तर त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली. त्यात अपयश आले तरी लोकसभा – विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा होत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विधान परिषदेतील एखादी जागा मिळावी, असा आग्रह त्यांचा होता.
पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते नाराज होते. आता राज्यपाल कोट्यातून काही जागा भरल्या जाणार असून यासाठी राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेली ऑफर सांगत याबाबत स्वाभिमानीच्या कार्यकारणी चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान राजू शेट्टी आमदार झाले तर ते राज्यात राहणार असल्याने भविष्यातील धैर्यशील माने यांच्या समोरचा मोठा अडथळा दूर होणार आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री