
| कल्याण | परतीच्या पावसामुळे तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीस तयार झालेले भातपीक शेतात आडवे झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहेत. त्यातच कोरोना साथीने आणखीनच हैराण करुन सोडल्याने शेतकरी गर्भगळीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून कल्याण तालुक्यातील शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
दसरा-दिपावली असे सण उत्सव जवळ येत असताना शेतकऱ्यांची यंदा उजेडात होणारी दिवाळी यंदा अंधारात होणार आहे. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी तहसीलदारांना निवेदन देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे.
कल्याण तालुक्यात आजही मोठ्या प्रमाणावर शेतकरी शेती करत असून त्यांचे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचे मान्य करत तहसीलदारांनी या शेतीचे पंचनामे करण्याची कारवाई तातडीने सुरु करण्याचे आश्वासन दिल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री