
| इंदापूर/ महादेव बंडगर | कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी दि.१२ सप्टेंबर ते २० सप्टेंबर अखेर इंदापूर तालुक्यात जनता कर्फ्यू लागू करण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
तालुक्यात कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रसार पाहता कोरोनाची साखळी तोडणे खूप गरजेचे होते. व्यापारी पेठा बंद करून गर्दी नियंत्रित करण्यासाठी लॉक डाऊन बाबत काही कठोर निर्णय घेणे गरजेचे होते.आणि त्याच अनुषंगाने दिनांक १२ सप्टेंबर ते २० सप्टेंबर अखेर जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या संदर्भामध्ये सर्व व्यापारी संघटना व पदाधिकारी यांची बैठक इंदापूर येथे आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीमध्ये सर्वांच्या अडचणी ऐकून घेण्यात आल्या आणि त्यानुसार सर्वानुमते जनता कर्फ्यू लागू करण्याचे निश्चित करण्यात आले.
या कालावधीमध्ये तालुक्यातील जनतेने प्रशासनाने सांगितलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संपूर्ण तालुका वासियांना केली आहे .या लॉक डाऊन च्या यशस्वीतेनंतर खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्याची पुढील दिशा ठरणार आहे. त्यामुळे कोणताही हलगर्जीपणा न दाखवता. काटेकोरपणे लॉक डाऊन यशस्वी करून दाखवावा असे आवाहन भरणे यांनी नागरिकांना केले आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री