ठाण्यात १५ ऑगस्ट पासून सर्व आस्थापना सुरू होणार ; पालकमंत्र्यांनी केले प्रशासनाचे अभिनंदन..!

| ठाणे | ठाणे महापालिका चांगले काम करीत असून कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. १५ ऑगस्टनंतर शहरातील सम-विषमनुसार ज्या आस्थापना सुरू होत्या, त्या सर्व आस्थापना राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंत दररोज सुरू ठेवण्याच्या तसेच मॉल्स, मार्केट, जिम व स्विमिंग पूलबाबत आढावा घेऊन त्यानंतर निर्णय घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी महापालिका प्रशासनास केल्या.

कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर ठामपाच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या शहरातील सर्व व्यापारी संघटनांच्या बैठकीत पालकमंत्री बोलत होते.
ठाणे महापालिका क्षेत्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७ टक्के असून रुग्णदुपटीचा वेगही ९० दिवसांवर पोहोचला आहे. मृत्यूचे प्रमाण हे ३.५ टक्क्यांवरून ३.२ टक्क्यांवर आले आहे. ठाणे महापालिका सातत्याने करीत असलेल्या प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले आहे, असे सांगून पालकमंत्र्यांनी आयुक्त आणि मनपा प्रशासनाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *