
| ठाणे | अंजुषा अनिल पाटील यांना A Study of Mental Health And Home Environment Of Student या विषयात पी.एच.डी पदवी यु. जी. सी. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली आहे. अंजुषा पाटील यांनी ठाणे महानगरपालिकेत शिक्षक, मुख्याध्यापिका, केन्द्रप्रमुख, गटप्रमुख अशी महत्त्वाची पदे भूषविली आहेत.
ठाणे महापालिकेच्या सेवेतून त्या नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या आहेत. त्यांनी दैनिक ठाणे वार्ता, दैनिक लोकमत, दै प्रत्यक्ष, अचूकवार्ता साप्ताहिक अश्या नामवंत वर्तमानपत्रात लेखन त्यांनी केले आहे. त्यांना ठाणे महानगरपालिका आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला असून अनेक संस्थांकडून त्यांचा गौरव झालेला आहे. शारदा प्रकाशनतर्फे ‘लिहिता लिहिता’, व व्यास क्रिएशनतर्फे ‘गूज मनीचे’ व ‘ओंजळ’ ही तीन पुस्तके प्रकाशित झाली असून चार पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. अंजुषा पाटील यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
दरम्यान , शिक्षण उपायुक्त मनीष जोशी, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, लेखाधिकारी अजित धुरी, गटाधिकारी संगीता बामणे, अस्लम कुंगळे यांनी प्रशासनाकडून तर ठाणे जिल्हा शिक्षक सेनेचे अध्यक्ष सुनील फापाळे, ठाणे पालघर शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष तथा संचालक बाबाजी फापाळे, संचालक प्रकाश गायकवाड, संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र निकम, जगन जाधव, राजेंद्र बामणे, एक्का फाउंडेशनचे प्राजक्त झावरे पाटील, सचिन घोडे, विकास चव्हाण, किरण लहामटे आदी यांनी देखील त्यांच्या प्राविण्याबद्दल अभिनंदन केले आहे.
✓ ” प्रत्येक मूल समान असते. तरीसुद्धा काही मुलं अभ्यासात मागे पडतात. आमची ठाणे महानरपालिकेची मुलं सर्व क्षेत्रात अग्रेसर असताना विशिष्ट कुटुंबातील मुलः अभ्यासात मागे पडतात. कला, क्रीडा या विषयात पुढे असतात. हे लक्षात आल्यावर बालकांच्या समस्येवर संशोधन सुरु केल. ठाणे मनपाच्या हद्दीतील सर्व शाळांचा सर्व्हे केला. त्यातून काही शाळा निवडून शिक्षक, विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला. मुलाखती घेऊन प्रश्नावल्या सोडवून घेतल्या. त्यातून प्रबंधाने आकार घेतला. तब्बल ३८० पानांचा प्रबंध सादर करून या विषयातील डाॕक्टरेट पदवी मला प्राप्त झाली. “
– डॉ. अंजूषा पाटील
- नकळत सारे घडते..!
- मैं अपनी फेव्हरेट हूँ..!
- “पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!
- २०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!
- पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर !’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..!