
| मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे आणि एनसीपी खासदार सांसद सुप्रिया सुळे यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व नेत्यांवर निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीची चुकीची माहिती देण्याचा आरोप आहे.
या प्रकरणाचं गांभीर्य पाहता निवडणूक आयोगाने याचा तपास सीबीडीटीला दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या नेत्यांशिवाय गुजरात आमदार नाथाभाई ए पटेल यांच्या विरोधातही निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याची तक्रार करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यात सत्ताधारी पक्ष शिवसेना आणि त्यांच्यासोबतच्या एनसीपीच्या नेत्यावर आरोप आहे की यांनी निवडणुकीच्यावेळी आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिली आहे. यामध्ये अनेक ठिकाणी चुकीची माहिती असून काही रकाने अर्धवट आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारकर्त्याने आपल्या दाव्याचं समर्थन करण्यासाठी काही कागदपत्रं सोपवली आहेत. ज्यावरुन या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती असल्याचे समोर आले आहे. या डॉक्युमेंट्स पाहिल्यानंतर निवडणूक आयोगाने याचा तपास सीबीडीटीला पाठविली आहे.
एखाद्या उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास सध्याच्या कायद्यानुसार सहा महिने कैद किंवा दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री