![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2020/09/IMG_20200926_175321-e1609505741580.jpg?resize=880%2C528&ssl=1)
| मुंबई | राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मंत्रिमंडळात खांदेपालट करण्यात येणार असून नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मंत्र्यांच्या शपथविधीची शक्यता आहे. त्यात नाथाभाऊ खडसे यांचा देखील समावेश असू शकतो अशी सूत्रांची माहिती आहे.
तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये खातेबदल होणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेकडे गृहनिर्माण खातं दिलं जाण्याचीही शक्यता आहे. तर त्याबदल्यात कृषीसह एक वाढीव मंत्रिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला जाऊ शकतं. गृहनिर्माण, कृषी, रोजगार हमी, उत्पादन शुल्क, कामगार , अल्पसंख्यांक या खात्यांमध्ये खांदेपालट होणार असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन नव्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असंही समजते. त्यामुळे या दोन्ही पक्षातील मंत्रिमंडळात सामील होणार हे नवे चेहरे कोण, याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, एकीकडे राज्य सरकार अस्थिर असून केव्हाही सत्तापालट होऊ शकते, असा दावा भाजपकडून केला जात असतानाच महाविकास सरकारमध्ये मांत्र खांदेपालट होत आहे.
नव्या बदलानुसार सध्या राष्ट्रवादीकडे असणारं गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. जर खरोखरंच असा बदल झाला तर सध्या हे खातं ज्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आहे त्यांच्याकडे आगामी काळात नेमकी कोणती जबाबदारी दिली जाणार? याबाबतची चर्चा आता सुरू झाली आहे. तसंच शिवसेना या खात्यासाठी कोणत्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब करणार आणि नाथाभाऊ यांचा प्रवेश झाला तर त्यांना कोणते खाते मिळेल हेही पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे.
- सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा
- लोकसभा निवडणुकीत मतदानात होतेय हेराफेरी ? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचं सत्य
- कंपनी असावी तर अशी… IT कंपनीने बाजारपेठेत उडवली खळबळ, लाभांशाची करणार लयलूट
- मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका
- वसुली करणाऱ्यांना वसुली सोडून तसेही दुसरे काही सुचते असे नाहीच.