
| मुंबई | सध्या पूर्व लडाख सीमेवर भारत आणि चीनमध्ये प्रचंड तणावाची स्थिती आहे. दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने उभे ठाकले आहेत. पण डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या जयंतीच्या निमित्ताने चिनी संस्थेने एक कार्यक्रम आयोजित केला होता. या ऑनलाइन कार्यक्रमात भारतीय आणि चिनी विद्यापीठातील विद्यार्थी एकत्र सहभागी झाले होते. चीन आणि जपानमध्ये १९३८ साली युद्ध झाले. त्यावेळी चीनच्या जखमी सैनिकांवर उपचार करणाऱ्या भारतीय डॉक्टरांमध्ये डॉ. द्वारकानाथ कोटणीस होते.
१९३८ साली जखमी चिनी सैनिकांवर उपचार करण्यासाठी भारतातील पाच डॉक्टरांचे पथक चीनला रवाना झाले होते. त्यात डॉक्टर एम. अटल, एम. चोळकर, द्वारकानाथ कोटणीस, बी.के.बासू आणि डी. मुखर्जी होते. या पाच डॉक्टरांपैकी द्वारकानाथ कोटणीस वगळता सर्व डॉक्टर मायदेशी परतले.
दुसऱ्या देशांसोबत मैत्री संबंध ठेवणाऱ्या चिनी पीपल्स असोशिएशनने शनिवारी डॉ. कोटणीस यांच्या ११० व्या जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला होता. कोटणीस यांच्यावर आधारीत माहितीपट दाखवण्यात आला तसेच कोटणीस यांच्या कार्याबद्दल, त्यांच्या योगदानाबद्दल चर्चा करण्यात आली. लडाखमध्ये सुरु असलेल्या सीमावादामुळे सध्या भारत-चीनमधील द्विपक्षीय संबंध अत्यंत खराब स्थितीमध्ये आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम झाला.
भारतातून दून विद्यापीठ आणि गुजरात विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. चीनमधील वेगवेगळी विद्यापीठे या कार्यक्रमात सहभागी झाली होती. नवी दिल्लीतील चिनी दूतावासातील वरिष्ठ राजनैतिक अधिकारी सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री