सुशांत सिंह प्रकरणाचे पुढे नक्की काय झाले, याची मी देखील आतुरतेने वाट पाहत आहे – गृहमंत्री अनिल देशमुख

| मुंबई | सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू आत्महत्या की हत्या ? हा असा प्रश्न आहे, ज्याचे प्रत्येकाला उत्तर जाणून घ्यायचे आहे. सीबीआय सुशांत सिंह प्रकरणाचा तपास करत आहे. यातच, अनेकजण सीबीआय तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री ​अनिल देशमुख यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली. दिड महिन्यापासून सीबीआय सुशांत प्रकरणाचा तपास करत आहे. त्यांचा तपास कुठपर्यंत आला, त्यांना यात कोणत्या गोष्टी हाती लागल्या, याची आम्ही देखील आतुरतेने वाट पाहत आहोत, असे देशमुख म्हणाले.

​अनिल देशमुख यांनी सोमवारी मीडियाशी बातचीतदरम्यान म्हटले की, ‘सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस चांगल्या पद्धतीने करत होते. पण, अचानक त्यांच्याकडून तपास काढून सीबीआयच्या हाती सोपवण्यात आला. मला अनेकजण विचारतात सुशांतने आत्महत्या केली, की त्याची हत्या झाली. मीदेखील सीबीआय तपास कुठपर्यंत आला, याची आतुरतेने वाट पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *