| मुंबई | राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय आता फिरवण्यात आला आहे. सरकारने ३१ जुलै पर्यंत १५ % बदल्या त्याही ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जातील असे सांगितले होते. त्या निर्णयाला सर्वच शिक्षक संघटनांकडून विरोध करण्यात आलेला होता. शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांनी या बाबत थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे रविवारी कोल्हापुरात यासंदर्भात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीनंतर हा निर्णय फिरवण्यात आला आहे.
ऐन कोरोनाच्या संकटकाळात शिक्षकांच्या बदल्या करणं चुकीचं असल्याची तक्रार शिक्षक संघटनांनी केली होती. यासंदर्भात काल पार पडलेल्या बैठकीत इतर कोणत्याही बदल्या न करता फक्त विनंती बदल्या करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे.
- सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा
- लोकसभा निवडणुकीत मतदानात होतेय हेराफेरी ? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचं सत्य
- कंपनी असावी तर अशी… IT कंपनीने बाजारपेठेत उडवली खळबळ, लाभांशाची करणार लयलूट
- मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका
- वसुली करणाऱ्यांना वसुली सोडून तसेही दुसरे काही सुचते असे नाहीच.