शिक्षकांच्या १५% ऑफलाईन बदल्या रद्द, फक्त विनंती बदल्या होणार.!

| मुंबई | राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय आता फिरवण्यात आला आहे. सरकारने ३१ जुलै पर्यंत १५ % बदल्या त्याही ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जातील असे सांगितले होते. त्या निर्णयाला सर्वच शिक्षक संघटनांकडून विरोध करण्यात आलेला होता. शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांनी या बाबत थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे रविवारी कोल्हापुरात यासंदर्भात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीनंतर हा निर्णय फिरवण्यात आला आहे.

ऐन कोरोनाच्या संकटकाळात शिक्षकांच्या बदल्या करणं चुकीचं असल्याची तक्रार शिक्षक संघटनांनी केली होती. यासंदर्भात काल पार पडलेल्या बैठकीत इतर कोणत्याही बदल्या न करता फक्त विनंती बदल्या करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *