
| महेश देशमुख / सोलापूर | उजनी धरणातून ५ टीएमसी पाणी इंदापूरला उचलण्यावरून सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. सर्वच राजकीय पक्षांतून या योजनेला विरोध सुरू झाला आहे. आज एका वृत्त वाहिनीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगितले की, माझ्या पक्षाच्या नेत्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील आ. संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे की, सोलापूरच्या हक्काचे पाणी इतर कुठे वळणार नसून त्यावर सोलापूरकरांचा हक्क आहे व शासनाने जो आदेश काढलेला आहे तो आम्ही रद्द करू असे स्पष्टपणे सांगितले आहे.
यावर बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, सध्या श्रेयवादावरून बरीच चर्चा होत आहे, राजकीय आरोप एकमेकांवर करत आहेत परंतु ही वेळ राजकारण करण्याची नाही.यावेळी जिल्ह्याच्या हितासाठी सर्वांनी पक्षीय जोडे बाजूला ठेवून एकत्र येण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उजनी धरणामध्ये कोणत्याही प्रकारचे शिल्लक पाणी नाही. जिल्ह्यामध्ये दोन ते तीन पाळ्या देखील मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे त्यामुळे इंदापूरच्या योजनेला पुणे, पिंपरी-चिंचवड शहराचे सांडपाणी द्यायचे असेल तर ते पुण्याजवळच उचलून नजीकच्या खडकवासला कॅनल मध्ये टाकून द्यावे त्यास आमचा विरोध असण्याचे काही कारण नाही मात्र जर कोणी उजनीतून पाणी नेणार असेल तर आम्ही जनतेच्या सोबत राहू.
जर शासनाने उजनीतून पाणी उचलण्याच्या आदेश रद्द केला नाही तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वप्रथम मी आमदारकीचा राजीनामा देईन अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांनी घेतली.
” जर निर्णय रद्द नाही केला तर जिल्ह्यात सर्वात अगोदर न्यायालयात जाण्याचा इशारा मी स्वतः शासनाला दिला होता. आणि जर पुढील काळात आदेश रद्द नाही केला तर मी माझ्या जिल्ह्यासाठी सर्वप्रथम आमदारकीचा राजीनामा देईन. “
– आमदार बबनदादा शिंदे
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री